मानाच्या पाच गणपतींची सकाळी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक संपायला रात्रीचे आठ वाजत असल्याचे दर वर्षी दिसून येत असल्याने यंदा हा प्रकार टाळण्यासाठी पाच मंडळांनी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर पंधरा मिनिटांच्या अंतरांनी पाचही मंडळे लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात येणार आहेत. मंडईतील टिळक पुतळा ते बेलबाग चौक या दरम्यानच्या रस्त्यावर ढोलवादन न करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2zmLBHj
No comments:
Post a Comment