पश्चिम रेल्वेवरील अंधेरीतील पादचारी पूल कोसळल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी तातडीने शहरातील रेल्वेशी निगडित ४४५ पुलांचा सुरक्षा आढावा घेण्याची घोषणा केली. त्यासाठी देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असणाऱ्या आयआयटीचे सहाय्य घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे पुढील सहा महिन्यांत मुंबई महापालिकेच्या सहकार्याने संयुक्त सुरक्षा आढावा घेतला जाणार आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2KMWeWS
No comments:
Post a Comment