मुंबईमध्ये यंदा २ हजार २०० मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अर्ज करतील अशी अपेक्षा असताना गुरुवारपर्यंत एकूण अर्जसंख्या २ हजार ८४३ पर्यंत पोहोचली आहे. त्यातच ही तारीख ५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याने यात आणखी वाढ होईल, अशीही शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र यामध्ये यंदा ऑनलाइन अर्ज दाखल झाल्याने एका मंडळाने एका अर्जात चूक झाली तर दुसरा अर्ज अशा पद्धतीने अर्ज दाखल केल्याने ही आकडेवारी काही प्रमाणात फसवी आहे. यातील ६३८ अर्ज एकाच मंडळाने दुसऱ्यांदा अर्ज केल्याने रद्द झाले आहेत.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2PmTCAX
No comments:
Post a Comment