'आज मराठी भाषेची दशा केविलवाणी झाली आहे. 'माय मराठी' नव्हे तर, 'ममी मराठी' म्हणायची वेळ आज येऊन ठेपली आहे. आपले असंख्य मराठी शब्द आज कालबाह्य झाले आहेत. इंग्रज गेले, पण जाताना गनिमी काव्याने इंग्रजीचा वरचष्मा मात्र ठेवून गेले. एरवी लढाऊ म्हणून ओळखले जाणारे आम्ही मराठी लोक नेमके मराठीवरील या आक्रमणाच्या प्रश्नावर मात्र स्वस्थ का बसून राहतो, दुबळेपणाने नांगी का टाकतो, हेच मला कळत नाही. इंग्रजीची झिलाई चढलेली मराठी अजून कधीपर्यंत सहन करायची आपण ?...' असा सवाल ज्येष्ठ दिग्दर्शक तसेच लेखिका सई परांजपे यांनी उपस्थित केला.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines https://ift.tt/2GggKBr
No comments:
Post a Comment