'मराठी आणि वाङ्मयीन संस्कृतीची अवस्था वाईट आहे. साक्षरता वाढली, त्या प्रमाणात वाचक वाढले नाहीत. हल्ली ग्रंथालयात एकही चांगले पुस्तक नसते. ग्रंथालये ओस पडली आहेत. अशी भीषण परिस्थिती असतानाही सरकार ही आपली जबाबदारी मानत नाही. मराठी भाषिकांना भाषिक संस्कृतीचे विस्मरण झाले आहे. मराठी समाजाचेच मातृभाषेवर प्रेम नाही,' असे ताशेरे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी सोमवारी ओढले. 'बाजारू व्यवस्थेत वाङ्मयीन संस्कृती कशी टिकणार,' असा परखड सवाल त्यांनी केला.
from Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines http://bit.ly/2YU7rvl
No comments:
Post a Comment