'केवळ ग्रामीण चेहऱ्याचा पक्ष ही राष्ट्रवादीची ओळख बदलून, शहरी भागातही पक्षाचा जोर वाढविण्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजेत. नागरिकांना बदल हवा असतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. आपल्या पक्षसंघटनेच्या कामकाजाची पद्धत बदलून सोशल मीडियातील प्रचार व लोकसंवादाकडे जादा लक्ष द्या, असे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. पक्षाच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या http://bit.ly/2K9wEic
No comments:
Post a Comment