सध्या उत्तरेकडून थेट वाऱ्यांचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली नसली तरी देशभरात हळुहळू कोरडे वातावरण निर्माण आढळून येत आहे. ही परिस्थिती थंडीची चाहूल देण्यासाठी अनुकूल असून सध्या देशाच्या उत्तर भागात वायव्येकडून वाऱ्यांची दिशा असल्याचे आढळून येत आहे. महाराष्ट्रासाठी राजस्थानवरून फिरून वारे पूर्व दिशेकडून येत आहेत. मात्र कमाल तापमानाची ही परिस्थिती पुढील आठवड्यात बदलण्याची शक्यता असून सध्या ३५ आणि ३६ दरम्यान असलेले कमाल तापमान खाली उतरण्याची आशा आहे.
from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2KzMfVO
No comments:
Post a Comment